माझे मृत्युपत्र.
एप्रिल 2021 मधे माझ्या आईचा मृत्यु झाला. मृत्यु गवर्नमेंटच्या को*विड वॉर्डात झाल्याने मृतदेह घरी घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. थेट स्मशान घाटात तेही सरकारी वाहनातून मृतदेह सामूहिकरित्या नेल्या जात होते. एप्रिल महिन्यात मृत्यूचा तांडव सुरु होता.. स्मशानातही रांगा लागल्या होत्या. कोणतेही अंत्यविधी करण्याची परवानगी नव्हती. पण माणुसकीच्या नात्याने तिथले कर्मचारी मृतदेहाला स्पर्श करु न देता जवळच्या दोन कुटुंबियांना पुष्प वगैरे अर्पण करुन अग्नी देण्याची मुभा देत होते. त्याआधी तर कित्येक मृतदेह सरकारी यंत्रणेमार्फतच दहन करण्यात आले होते. कुटुंबियांना अंतिम दर्शनसुद्धा घेता आले नाहीत. त्या अवधीत मरण पावलेल्या लोकांना कोणतेही पारंपारिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने उरकता आले नाहीत. तिथून अकरा महिन्यांनी माझ्या भावाने अक्करमास वगैरे विधी पुरोहिताकडून करुन घेतलेत. मी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. परंतु आपल्या आईप्रति आदर आणि भाऊ बहिणीचं मन ठेवण्यासाठी म्हणून थोडा वेळ त्यांच्यात शामिल झालो. तिथंही बोलावण्यात आलेले दोन्ही पुरोहित पूजेच्या मधातच ब्रेक घेऊन परधर्मद्वेषयुक्त चर्चा उकरून काढत होते अन आ...